श्लोक २१
पुन: पुन: जन्म मरणाचे कालचक्र
पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननीजठरे शयनम् ।
इह संसारे बहुदुस्तारे
कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥ २१ ll
भज गोविन्दम भज गोविन्दम
पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू, पुन्हा आईच्या गर्भाशयात येणे ! – असा संसार ओलांडणे अवघड आहे… हे मुरारी (मुरा चा वध करणारा) तुझ्या असीम दयाळूपणाने मला ह्यातून वाचव.
गोविंदाला स्मरा गोविंदाला स्मरा !!
श्लोक २१ वर आधारित कथा
कर्मा
एक माणूस त्याच्या जीवनात अनन्य त्रासातून जात होता. तो त्याच्या परिवाराचा, ज्यात त्याचे वयस्कर पालक, बहिणी, त्याची पत्नी आणि मुल, एकुलता एक पोशिंदा होता. एक दिवस तो खूप आजारी पडला आणि
जवळजवळ एक आठवडा कामावर जाऊ शकला नाही, परिणामी त्या माणसाला नोकरीवरून काढून टाकले. त्याच्या कुटुंबाचे पोषण कसे करावे हे कळत नव्हते, तो खूप निराश झाला. त्याने त्याच्या अवतीभवती लोकांना आनंदात आणि आरामशीर जीवन जगत असलेले पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले की तो एकटाच का ग्रस्त आहे? तो त्याच्या प्राक्तन वर उदास बसलेला असताना गावात एक महान संताच्या त्या गावात आगमनाची आणि ते तिथेच महिनाभर राहतील, घोषणा झाली. ते संत तिथे गावात प्रार्थना आयोजित करणार आणि अध्यात्मिक भाषण ही देणार होते. ह्या कालावधीत, एका श्रीमंत व्यापारीने
सर्व गावातील लोकांना संपूर्ण महिना मोफत जेवण देण्याचे आयोजित केले आणि सर्वांना निमंत्रण होते.
मनुष्याने ही घोषणा ऐकताच, कमीतकमी महिनाभरासाठी आपल्या घराच्या अन्नाचा प्रश्न सुटेल आणि त्यादरम्यान तो दुसर्या नोकरीचा शोध घेऊ शकणार एवढेच नाहीं तर गुरुजींना ऐकण्याची संधी ही मिळेल, असे त्याला वाटले.
दुसऱ्या सकाळी गावात गुरुजींचे आगमन झाले, त्या माणसाने गुरुजींचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना सांगितले की जोपर्यंत ते त्यांच्या गावात राहतील तोपर्यंत त्याला दररोज त्यांची सेवा करायला आवडेल. गुरुजी या माणसावर खूष होते आणि त्यांनी आपल्या रोजच्या प्रार्थना इत्यादींची काळजी त्याला घ्यायला सांगितले. हा माणूस प्रामाणिकपणे, अत्यंत उत्साहाने आणि प्रेम व भक्तीने, दररोज गुरुजींची सेवा करू लागला. प्रत्येक संध्याकाळी तो गुरुजींचे भाषण ऐकत असत. तथापि मानसिकदृष्ट्या तो त्याच्या भविष्याबद्दल व्याकुळ झाला होता आणि इतके दुर्दैवी कारणे त्याच्यावर का आली. गुरुजी एक अनुभवी मास्टर होते आणि एक संध्याकाळी त्यांनी कर्मावर प्रवचन दिले. त्यांनी कर्माचे खालीलप्रमाणे सुंदर वर्णन केले.
कर्मांचे ४ प्रकार आहेत :
- प्रारब्ध कर्म – परिपक्व कर्म
कल्पना करा की एका झाडावर सफरचंद चे फळ आहे. ते परिपक्व आहे. एकत्र ते वेळेवर झाडावरून तोडावे नाहींतर ते स्वत: झाडापासून वेगळे होऊन खाली जमीनेवर पडेल. ते कायमस्वरूपी झाडावर नाहीं राहू शकत. त्याचप्रमाणे, प्रारब्ध एक परिपक्व कर्म आहे. केंव्हातरी, तुम्ही एका वृक्षाची लागवड केली आणि त्याचे फळ आज परिपक्व झाले. तुमची इच्छा किंवा प्राधान्य काही असो, त्याने स्वतःचा मार्ग घेतला आहे, अगदी ज्याप्रमाणे धनुष्य सोडलेला बाण. एकदा का तुम्ही कुठले ही कर्म केले, त्याची नोंद विश्वात होते, एके दिवशी ते फळ धरते. ह्यातून सुटका नाहीं. सध्या तुमच्या जीवनात जे काही घडते, सध्या हा शब्द लक्षात घ्या, तुमचे ह्याचावर काहीच नियंत्रण नसते, हेच तुमचे प्रारब्ध आहे. तुम्ही गेल्या जन्मी किंवा आधीच्या जन्मी जे काही पेरले लागते, त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट, हे भोगावेच लागतात. तुम्ही जर विचार करत असाल की तुम्हाला एवढे का भोगावे लागते तर ते तुमच्या मागील कर्मांचे परिणाम आहेत. एखाद्याला मागील कर्मांचे परिणाम भोगावेच लागतात. पण ह्याचा अर्थ असा नाहीं की तो त्याचे भविष्य बदलू शकत नाहीं. प्रारब्ध म्हणजे जे परिपक्व आहे. कुठले ही कर्म भविष्यात परिपक्व होत असेल, ते प्रारब्ध नाहीं, हे दुसऱ्या श्रेणीत येते :
- संचित, संग्रहित कर्म
हे तुमच्या कर्मांचा संचय आहे. वृक्षावरील सर्व फळे एकच दिवशी पिकत नाहींत, पुढच्या हंगामात त्याच्यावर परत फळे येतील, आणि पुढच्या आणि त्या पुढेही. ह्याच कारणांस्तव प्रचंड लोकांच्या आयुष्यावर हे चक्रीय आहे. का? तुम्ही जर सफरचंदांचे वृक्ष लावले आहेत, हंगामात तुम्हाला भरपूर फळे प्राप्त होतील आणि, जर तुम्ही कितीही आकर्षित असलेले वन्य बेरींची लागवड केली असेल, काटेरी झुडुपे त्यांचे संरक्षण करत असले तरी, त्यांच्या हंगामात त्यांचा खूप भरभराटीत वाढ होईल. म्हणूनच संकट क्वचितच एकट्याने येतात, ते नेहमी झुन्डात येतात, तसाच चांगला काळ. संचित कर्मांत एक अद्वितीय गोष्ट आहे, ते बदलू शकते! आपण आपल्या सफरचंद किंवा बेनबेरीच्या स्त्रोताकडे जाऊ शकता तर आपण त्यांचे पालनपोषण करणे निवडू शकता, किंवा त्यांचा पूर्णपणे नाश करू शकता. स्त्रोताकडे जाने महत्वाचे आहे.
- आगामी, आगामी होणारे कर्म
कल्पना करा की तुम्ही सफरचंदाच्या बागेत गेलात. तुम्ही एक कर्म केले, तुम्ही निवडही केली, सक्ती किंवा स्वैच्छिक, पर्वा न करता. ह्या कर्मावर आधारित, तुम्ही नक्कीच अन्य असे कर्म करणार जसे की सफरचंदाच्या वृक्षांची पाहणी करणे, त्यांचा सुगंध अनुभवणे, आणि त्याचे परिपक्व होण्याची वाट पाहणे, हे एक निश्चित कर्म आहे. या कर्माचे महत्त्व कमी किंवा अधिक लेखले जाऊ शकत नाही. आपण आजची निवड तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करतो, आपण वर्तमानात काय करता ते पुढील काळात उलगडत. आगामी कर्म हे अनिवार्य आहेत, जरी असला तरी, तुम्हाला पर्याय नाहींत. तुम्ही जर बागेत प्रवेश केला असेल, तुम्हाला बाहेर पडायची कार्रवाई करावीच लागेल, लवकर नाहीं तर उशिरा. तथापि, जर तुम्ही तुमचे संचित कर्मांचे संचय बदलले किंवा वर्तमान कर्मात फेर बदल करण्याचा उचित उपाय केला, हे आपोआप बदलेल.
- वर्तमान, उपस्थित, कर्म
ह्याला क्रीयामानही म्हणतात, कारवाई करण्यायोग्य, वर्तमान कर्म, जे घडत आहे. अजून एक ठराविक मुदत आहे, ज्याला कदाचित पुरुषार्थ म्हणतात, मेहनत, कर्म. आपण असे समजूया की तुम्हाला सफरचंद नकोत. तुम्ही वृक्ष कापू शकतात, तुम्ही ते उपटून टाकू शकतात. तुम्हाला व्यवस्थापित करण्याचा मार्ग शोधावा लागेल किंवा विल्हेवाट लावावी लागेल, सडलेले सफरचंद, ओला कचरा आणि इतर सर्व गोष्टींचा विल्हेवाट लावावी लागेल, पण तरी ही एक तीव्र प्रयत्न. त्यानंतर, वर्षोनुवर्षे कोणतेही फळ तुमची वाट पाहणार नाहीं. तुम्ही फक्त गहू पेरणे आणि काही महिन्यानंतर ते कापणे, हे निवडू शकता, नियमितपणे तुमच्या कार्मिक शेतीची स्वच्छता करणे.
एक समर्पक प्रश्न हा आहे की तुम्ही नवीन कर्मे करतात किंवा मागील कर्मांचा परिणाम भोगत आहात. उत्तर सोपे आहे, जेंव्हा तुम्ही निवडलेले कार्य करतात, तुम्ही एक नवीन कर्म घडवतात आणि जेंव्हा तुमच्यावर काही करण्याची सक्ती होते, तुम्ही केवळ तुमच्या मागील कार्मिक कर्जाची परतफेड करतात. माजी कर्मांचे परिणाम आपल्यासाठी चांगले किंवा वाईट असो भोगावेच लागतील, त्यानंतर आपल्या कर्माचे संचय किंवा संचित कर्म दुसर्या शब्दात व्यवस्थापित करून, त्यांच्यावर निगा राखले जाऊ शकतात. आपल्याला कोणतेही फळ नको असल्यास चांगले किंवा वाईट, तुम्ही सर्व कृत्ये नि:स्वार्थपणे करून परमेश्वराला अर्पण करा. जेव्हा एखाद्याने त्यांच्या मागील सर्व क्रियांचे फळ संपवले असेल तेंव्हाच हे होऊ शकेल.
आपण काल निवडलेले कर्म, ऐच्छिक किंवा अन्यथा, आपल्याला आहात त्या ठिकाणी आणून पोचवले आहे आणि आज आपण निवडलेले कर्मे तुमचे भविष्य ठरवेल. म्हणूनच, आपण लक्षपूर्वक कृत्ये करणे हे सर्वोपरि महत्वाचे आहे, आपले सध्याचे विचार, भविष्यात उपलब्ध निवडी थेट ठरवणार, आपल्या सध्याच्या क्रियांचे व्युत्पन्न, आपले भविष्य, चांगले, वास्तविकतेने, आपले जीवन यावर अवलंबून असते.
अशा प्रकारे गुरुजींनी त्यांचे भाषण संपविले. या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर खूप आनंद झाला आणि त्यांनी चांगल्या आचार आणि विचारांचा सराव सुरु केला. लवकरच गुरुजींना गाव सोडून जाण्याची वेळ आली. ज्या माणसाने इतक्या विश्वासाने त्यांची सेवा केली त्याच्यावर ते खूप खुश होते. त्यांनी त्याला खूप आशीर्वाद दिले. ज्या श्रीमंत व्यापार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी ही ह्या माणसाचे प्रामाणिकपणा आणि समर्पण पाहिले होते आणि त्यानी त्या माणसाला त्याच्या कंपनीत चांगली नोकरी दिली आणि तो माणूस त्याच्या सर्व संकटांतून मुक्त झाला.
म्हणूनच त्या माणसाला हे समजले की ते त्याचे वाईट कर्म होते ज्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागला आणि त्याचे चांगले कर्म होते ज्याने त्याला गुरुजींना भेटण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्याने शिकवलेले धडे मनापासून घेतले आणि त्याच्या कृतींवर अर्थपूर्ण लक्ष ठेऊन जीवन जगण्यास सुरवात केली.
सार
एखादा माणूस त्याची वासना किंवा प्रवृत्ती संपवण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपल्या मार्ग आणि ध्येयाच्या अज्ञानामुळे, आपल्यातील बहिर्मुखीपणा आपल्याला वस्तूंसह स्वतःला जोडण्यास भाग पाडते, ज्याचे आपल्या मनानी निर्माण केलेले सौंदर्य आणि लावण्य आहे ! अहंकार आणि अहंकारिक इच्छा न वापरता हे संपवणे, हीच एक युक्ती आहे.
कधीकधी, आपण गुलामगिरीतच सुखदायी असतो. आपल्याला ज्ञान न मिळाल्यास आपण अडकतो. जर आपल्याला ते मिळाले, पण त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य नसले, तरीही आपण पुन्हा अडकतो.
म्हणूनच, आपण जर सर्वोच्च कृपा प्राप्त करण्यासाठी मनोभावे कळकळीने विनंती केली, तर आपल्याला नक्कीच प्राप्त होईल.
विद्यार्थयांसाठी
नीती : योग्य आचरण
उपनिती : सकारात्मक विचार
कर्म म्हणजे काय ?
बुद्ध, त्यांच्या शिष्यान सोबत बसले होते. एकाने त्यांना विचारले, “कर्म म्हणजे काय?”
बुद्ध म्हणाले, “तुम्हाला एक गोष्ट सांगतो…”
एक राजा त्याच्या राज्यात हत्ती वरून भ्रमण करत होता. अचानक बाजारातल्या एका दुकानाच्या समोर ते थांबले आणि त्यांनी त्यांच्या मंत्रीला म्हटले, “का कोण जाणे, पण मला ह्या दुकानदाराला फाशी द्यावीशी वाटते.” मंत्री दचकले. पण राजाला काही विचारण्याआधीच, राजा पुढे चालले गेले.
दुसऱ्या दिवशी, मंत्री गावकर्याच्या वेशात त्या दुकानदाराला भेटण्यास त्याच्या दुकानात गेले. त्यांनी सहजच त्याला त्याचा धंदा कसा चाललाय ते विचारले. दुकानदार, एक चंदनाचा व्यापारी, खिन्नपणे म्हणाला की त्याच्याकडे ग्राहक येत नाहींत. लोक त्याच्या दुकानात येतात, चंदनाचा सुवास घेतात आणि निघून जातात. ते चंदनाची प्रशंसाही करतात पण क्वचितच विकत घेतात. तो एकच उमेद बाळगत होता की रजनी लवकरच मृत्यू पावावे. त्याच्या नंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी चंदनाची खूप मोठी मागणी येईल. कारण तो एकटाच चंदनाचा व्यापारी होता, त्याला खात्री होती की राजा चा मृत्यू म्हणजे घबाड होईल.
आता त्या मंत्र्याला कळले की राजा त्या दुकानाच्या समोर का थांबले होते आणि त्या दुकानदाराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित, त्या दुकानदाराचे नकारात्मक विचारांचे कंपन राजाला अलगद शिवून गेले होते, ज्यांनी, परिणामी, तत्सम नकारात्मक विचार त्यांच्यात निर्माण केले.
मंत्री थोर होते, त्यांनी ह्या विषयावर घन विचार केले. त्याला आपण कोण आहोत हे व्यक्त न करता किंवा आदल्या दिवशी काय घडले होते, हे न सांगता, त्यांनी थोडे चंदन घरेडी करण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदाराला आनंद झाला. त्यांनी चंदन एका कागदात गुंडाळले आणि मंत्र्याला दिले.
मंत्री महालात गेले आणि थेट राजा बसलेले त्या दरबारात गेले आणि म्हणाले की चंदनाच्या व्यापार्याने त्यांच्यासाठी भेट दिली आहे. राजा आश्चर्यचकीत झाला. त्यांनी जेंव्हा गठ्ठा उघडला, सोनेरी रंगाच्या आकर्षक चंदन पाहून आणि सुगंधाने हर्षित झाले. प्रसन्न होऊन, त्यांनी त्या चंदनाच्या व्यापार्यासाठी काही सुवर्ण मुद्रा पाठवल्या. राजाला त्या दुकानदारा विषयी आपल्या मनात आलेल्या वाईट विचारांच दुख झाले.
राजा कडून आलेले सुवर्ण मुद्रा स्वीकारताना, दुकानदाराला आश्चर्य वाटले. तो राजाचा गुणगान करू लागला, कसे त्या सुवर्ण मुद्रांनी त्याला, दारिद्र्यातून वाचवले ह्याचा जाहीररीत्या घोषणा करू लागला. काही काळा नंतर, राजा विषयी त्याचे वाईट विचारांचा त्याला आठवण झाली आणि स्वतःच्या ध्येयासाठी आलेले नकारात्मक विचारांचा त्याला खंत वाटू लागला.
जर आपल्याकडे दुसर्या व्यक्तीसाठी, चांगला आणि दयाळू विचार असेल तर तो सकारात्मक विचार आपल्याकडे अनुकूल मार्गाने परत येईल. परंतु आपण जर वाईट विचारा बाळगले तर, हे विचार प्रतिफळ म्हणून आपल्याकडे परत येतीलच.
“कर्म काय आहे?” बुद्धनी विचारले
अनेकांनी उत्तर दिले, “आपले शब्द, आपले आचार, आपले विचार, आपले कार्य…..”
बुद्द्नी डोक हलवत म्हटले, “तुमचे विचार तुमचे कर्म आहेत!”
शिकवण
आम्ही जे देऊ ते आम्हाला मिळेल. प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया आणि प्रतिकृती बद्दल आहे. चांगले विचार, कृती आणि क्रिया समान परत मिळतील.
पुन्हा विद्यार्थ्यांसाठी; जेव्हा आपल्याला असे तत्वज्ञान साध्या कथांद्वारे आणि अनुभवांद्वारे दार्शनिक संकल्पना द्वारे समजावले जातात; आपण कसे विचार करावे, कसे वागावे हे निवडण्यासाठी, आपणास आपल्या कृतीची जाणीव व्हावी आणि आपण त्यानुसार कार्य करावे, निदर्शन होते. या मूल्ये आणि शिकवणी लहानपणापासूनच आत्मसात केल्यावर, आपल्या शिक्षणादरम्यान, कामात आणि आयुष्यात, आपल्याला जेव्हा सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा. अशा लोकांना संतुलित जीवन मिळेल आणि भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींचा आनंद स्पष्ट समजून घेऊन जगता येईल.